30 July 2024

आई समजून घेताना

 काही दिवसांपूर्वी दैनिक सकाळ मध्ये सप्तरंग म्हणून पुरवणी येत असे.सदर पुरवणी मध्ये फिरस्ती हे एक सदर होतं बाकीचे छान छान गोष्टी त्याच्यामध्ये येत होत्या त्या रियल गोष्टींची इतकी आवड निर्माण झाली की त्याच्या लेखकाचे आणखीन काही पुस्तक आहेत का वाचायची इच्छा निर्माण झाली त्यातच मला समजले, त्याची लेखक उत्तम कांबळे यांची आई समजून घेताना हे पुस्तक आहे नंतर पाहिलं तर कळल या पुस्तकाची खूप ऐकायला मिळालं तेव्हाच ठरवलं होतं की हे पुस्तक मिळालं की वाचायचं खूप दिवसांनी तो योग आला आणि नेमके ते पुस्तक हातात पडलं खरंच उत्तम कांबळे चे पुस्तक वाचून खूप बरं वाटलं आईला भेटले याचा समाधान लाभले.

आई समजून घेताना 

पोटातील भूक शमवण्यासाठी आवकाने जणू एक फॉर्म्युलाच तयार केला होता, माझ्यात शब्दांत पाणी फॉर्म्युला भूक जास्त लागली असेल आणि खाण्यासाठी अन कमी मिळत असेल तर जेवणापूर्वी भरपूर पाणी प्यावं... जेवता जेवताही प्यावं आणि जेवणानंतरही प्यावं... सबब अन्नाऐवजी पाण्यानेच पोट भरतं... कमी अन्नात भागतं, उपासमारीच्या काळात आणि विशेषतः डायबेटीस पचवण्याच्या काळात मला हा फॉर्म्युला खूप उपयोगी पडला. डायबेटीसवाल्याला खूप कडाडून भूक लागते. भरपूर खावंसं वाटतं अशा वेळी पाण्याचा मारा करून भुकेची धग संपवता येते. काही काळासाठी तरी शांत होते. आक्कानं स्वतः हा फॉर्म्युला आयुष्यभर वापरला. जेव्हा खाण्याचे दिवस आले तेव्हा तिच्या रोगाचेही दिवस आले हातात हात घालून... शस्त्रक्रिया न करता हाइड्रोथेरपीचा वापर करून आणि तिला ... पण आम्ही तिला प्रोत्साहन द्यायचो... बायको

भरपूर पाणी प्यायला सांगून मुतखडा बाहेर पडतो का याचा प्रयोग सुरू झाला... खूपखूप पाणी पिताना ती कंटाळायची... एकसारखं पाणी पिऊन आतडी सुजतील असं म्हणायची

प्रोत्साहन द्यायची... नातवंडं प्रोत्साहन द्यायची... आक्का पी पाणी... आत्या पाणी प्या... आजी पी पाणी... भरपूर पी... आणखी पी... पाणी फॉर्म्युला म्हातारपणी आपल्यावर उलटेल असं तिला कधी वाटलं नसावं.. 

@ उत्तम कांबळे

28 July 2024

बाबासाहेब तुमच्या आयुष्याचा हिशोब लागत नाही

 दोन मिनिट वेळ असेल तर जरूर वाचा..

दिनांक:६ डिसेंबर २०२३ रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनी महानगर पालिकेने काढलेली पुस्तिका, यात अभिवादन पर कव्हर पेज वर हेरंब कुलकर्णी यांनी लिहिलेल जरूर वाचावं.


उणेपुरे मिळालेले ६५ वर्षांचे आयुष्य, त्यात ३० वर्षे शिक्षणात आणि १९४६ नंतरचा काळ दिल्लीत व्यस्त राहिलेला. अवघी २५ वर्षे मिळाली बाबासाहेबांना चळवळ आणि लेखनाला...

त्यात तब्येतीची अजिबात साथ नाही. इतक्या थोड्या काळात हा माणूस नियतकालिके चालवतो, २३ ग्रंथ लिहितो,

शेकडो लेख लिहून

भाषणे करत राहतो.

मनुस्मृती दहन, चवदार तळे, काळाराम मंदिर आंदोलन, शिक्षणसंस्था स्थापना, राजकीय पक्ष स्थापन करुन निवडणुका, गोलमेज परिषद आणि हजारो मैलांचा प्रवास...

वाचन लेखनावरची पकड सुटू न देता...

हे सारे सारे कसे जमवले असेल याचा हिशोब लागत नाही...

आजच्या नेत्यांसारखे विमान, हेलिकॉप्टर हाताशी नाही, मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियामधून पोहोचणे नाही, अनुयायांना संदेश द्यायला Whatsapp नाही की बोलायला फोन नाही...

खडबडीत रस्ते आणि रेल्वेतून गावकुसाबाहेरच्या त्या नॉट रिचेबल वस्त्यावस्त्यावर

कसे पोहोचत असतील त्यांचे संदेश आंदोलनाचे, खेडी सोडण्याचे आणि पोरांना शिकवण्याचे...

पुन्हा ज्यांच्याशी संवाद करायचा, ती सारी माणसे टेक्नोसॅव्ही नसणारी...

फाटकी, निरक्षर, अन्यायाने पिचलेली, भेदरलेली

त्यांना समजेल अशा भाषेत हा पदवी घेतलेला कायदेपंडित कोणत्या सुगम भाषेत बोलला असे

?की ज्या शब्दांनी गावाच्या पाटलासमोर नजर वर न करणारी माणसे थेट व्यवस्थेची गचांडी

पकडू शकली...

न बघितलेल्या या माणसावर कशी श्रद्धा निर्माण झाली असेल त्या खेड्यापाड्यातील माणसांची...

नुसत्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुमचा अभ्यास करायला हवा बाबासाहेब,

आणि माणसांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरलेल्या तुमच्या पद्धती समजून घ्यायला हव्यात

कारण आज सगळी साधने हाताशी असूनही आम्ही गावकुसाबाहेरच्या माणसांपासून अनरिचेबल आहोत......

कोसो दूर....

कसे वेगाने पोहोचले असतील बाबासाहेब?

- हेरंब कुलकर्णी अकोले, जि. अहमदनगर

परवड

 || परवड  ||

सप्त पदी चालता चालता,

स्वप्न मनात किती रंगविली,

सुखाचा संसार थाटण्या सख्या,

तुझ्या मागोमाग चालली...

गोंडस बाळे,सुंदर घरकुल,

मनात साठवून ठेवली,

जगंनियंत्याला स्मरून,

तूझ्या मागोमाग चालली...

थोडे दिवस संसार सुखाचा?

चालला होता रडत कढत,

सुचेना घर,"अग"ची याद,

चालली मागे फरफटत...

उद्ध्वस्त स्वप्न,नाही बाळे,

सुरूच राहिले तुझे चाळे,

छातीवर दगड ठेवून,

तूझ्या मागे पळ पळ पळे...

बाटली पाहून पारदर्शक,

नितळ मनाची आतली,

माझ्या पेक्षा तिने तुला,

बग रे मोहिनी घातली.

नको घाव घालू सख्या,

थांबवं रे माझी परवड,

अहेवाचे लेणं लावून,

थांबव माझी वणवण...


श्री. निवृत्ती कोरडे,

८८८८८५१६६६

बोरी बुद्रुक,

शिवभूमि:-जुन्नर,

पुणे / मुंबई

27 July 2024

पाच वर्षात 628 वाघांचा मृत्यू


योगायोग म्हणावं कि काय सांगता येणार नाही काल कोयना डॅम परिसर फिरण्याचा योग्य आला माझा मित्र नितीन पाटील त्याविभागात ग्रामसेवक म्हणून कामकारतो त्याच्या मदतीने त्याठिकाणी असलेलं व्याघ्र प्रकल्प जवळून पाहण्यासाठी गेलो प्रकल्पाची मांडणी आणि नियोजन पाहून खूप छान वाटले.

त्याचा निरोप घेतला आणि घरी परतलो आणि आज सकाळी हाती आलेली माहिती पाहून कसंतरी  वाटले 

 पाच वर्षांच्या कालावधीत नैसर्गिक तसेच अन्य कारणांमुळे ६२८ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाकडून (एनटीसीए) देण्यात आली. दुसरीकडे वाघांच्या हल्ल्यात ३४९ लोकांचा मृत्यू झाला

असल्याचेही "एनटीसीए " कडून सांगण्यात आले. वाघांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले दोनशेपेक्षा जास्त लोक महाराष्ट्रातले आहेत.

देशात अलीकडच्या काळात २०२३ मध्ये वाघांचा सर्वाधिक मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. २०१९ आणि २०२० मध्ये वाघांच्या हल्ल्यात प्रत्येकी ४९ लोकांचा मृत्यू झाला.

२०२१ मध्ये हीच संख्या ५९ इतकी होती. २०२२ मध्ये ११० तर २०२३ मध्ये ८२ लोकांचा मृत्यू झाला. वाघांच्या हल्ल्यात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दोनशे लोकांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात ५९ आणि मध्य प्रदेशात २७ लोकांचा मृत्यू झाला. २०२२ च्या आकडेवारीनुसार देशातील वाघांची संख्या ३ हजार ६८२ इतकी होती. व्याघ्र

संवर्धनासाठी केंद्र सरकारने १९७३ साली "प्रोजेक्ट टायगर" ची सुरुवात केली होती. देशात सध्या ५५ व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहेत. याची व्याप्ती ७८ हजार ७३५ चौरस किलोमीटरवर पसरलेली आहे.



एक होता कर्व्हर

 

अधिकाधिक उपभोगांच्या हव्यासामुळे,

एका विचित्र वळणावर सारी मानवजात येऊन ठेपली

आहे. आता आपल्या सर्वांपुढे केवळ दोनच पर्याय उरलेले आहेत.

नैसर्गिक साधनसंपत्तीचा विनाश करणाऱ्या

आजवरच्या या आत्मघातकी मार्गावर

हताशपणे वाटचाल करायची किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखवलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या

संवर्धन-विकास-उपयोग-पुनर्भरण या शाश्वत कृषिसंस्कृतीचा स्वीकार करायचा.

भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा पाया घालायचा असेल तर

प्रत्येक सुजाण नागरिकाने वाचायलाच हवे असे पुस्तक

एक होता करव्हर 

भटक्याचे भारूड


 राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्र विधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्तानिमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्न विचारले, प्रस्ताव मांडले. त्यातील निवडक साहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनाशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्य रोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलती हा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो

॥ ग्रंथाली ॥ * ॥

05 February 2023

माघ पौर्णिमा विशेष

 *🟡  माघ पौर्णिमा  🌈🌈🌈🌈🌈                                                                                      🪷आज (०५/०२/२०२३) माघ पौर्णिमा आहे.. यालाच पाली भाषेत (माघो) असेही म्हणतात*                

   *ही पौर्णिमा  साधारणतः फेब्रुवारी महिन्यात येते. माघ पौर्णिमेला बुद्धाच्या जीवननात काही महत्वपूर्ण घटना घडल्यात*.

*पहिली घटनाः-विहाराचा* *शोध.वैशाली नगरीत माघ* *पौर्णिमेला अति महत्वाच्या तीन घटना घडलेल्या आहेत. बिहार राज्यातील वैशाली या ठिकाणी भगवंताच्या धातू अवशेषावर बांधलेला एक स्तुप सापडला तो माघ पौर्णिमेलाच. वैशाली मुक्कामी बुध्दांनी आपल्या अंतिम समयी केलेल्या घोषणेस वैशालीवासी व सर्व बौद्ध जनता कदापिही विसरणे शक्य नाही.भगवंताच्या जीवनात व माघ पौर्णिमेस मोठे भावनिक महत्त्व प्राप्त झालेले आहे.भगवंतानी येथे केलेल्या घोषणेमुळे वैशालीनगरी अजरामर झाली.बौद्ध साहित्यातील प्रमुख ग्रंथामध्ये वैशाली नगरीचा उल्लेख महत्त्वाच्या ऐतिहासिक गाथा आणि परंपराच्या संदर्भात अनेक वेळा आढळून येतो. आम्रपाली..वैशालीचीच.. महा प्रजापती गौतमीसह ५०० महिलांना प्रथम दिक्षादिली वैशालीतच.. वैशालीच्या गणतंत्र .पध्दतीवरुन भगवंतानी भिक्खू संघाची रचना केली. द्वितीय संगीती संपन्न झाली. वैशालीतीच...आपल्या जीवनातील दोन वर्षावास(५वा आणि ४६वा तथा अंतिम)भगवंतानी या वैशालीतच पूर्ण केले..*

*वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणाभगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*वैशालीचे अंतिम दर्शन*

*आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*१🔹वैशाली येथे तथागतांच्या धातू अवशेषावर बांधलेला स्तूप सापडला*

*भगवंताच्या महारीनिब्बाणा नंतर कुशीनगर येथे पवित्र धातू अवशेषांची समान आठ भागांत वाटणी करण्यात आली. त्यापैकी एक वाटणी वैशालीचे लिच्छवींनाही प्राप्त झाली. त्यावर त्यांनी एक स्तूप बांधला. चिनी प्रवासी  हुआन-त्संग  यांच्या प्रवास वर्णनावरून मार्च  १८५८ मध्ये श्री अनंत सदाशिव आल्टेकर यांनी हा स्तूप शोधून काढला. त्यापूर्वी तो मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेला होता. भाजलेल्या विटांनी भाजलेला हा साधा स्तूप होता. स्तूपाच्या आत भगवंताच्या पवित्र धातू ठेवलेला एक कुंभ मिळाला*

*२.🔹बुद्धाची महापरिनिब्बाणाची घोषणा*

*वैशाली येथील चापाल विहारात आराम  करीत असतांना भगवंतांनी आपला प्रिय शिष्य आनंद यास जवळ बोलावून म्हणाले हे आनंद!!! तथागत आजपासून तीन महिन्यांनी म्हणजे वैशाखी पौर्णिमेस महारिनिर्वाण पावतील.तो दिवस होता इ.स.पू. ४८४ च्या माघ पौर्णिमेचा.भगवंतांनी घोषित केल्याप्रमाणे वयाच्या ८० व्या वर्षी उत्तररात्री रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी वैशाख पौर्णिमेस कुशीनगर येथे भगवान  बुद्धाचे शालवृक्षाखाली* *महापरीनिर्वाण झाले*.

*३.🔹भगवंताच्या भिक्षापात्राची भेट*

*तथागतांनी त्यांच्या  महापरिनिब्बानाच्या घोषणेच्या दुसऱ्या दिवशी वैशाली येथील त्यांच्या शेवटच्या चारिकेनंतर शहराच्या बाहेर निघायला लागले, तेव्हा .. त्यांच्या मागे मागे  सर्वलिच्छवी दुःखी मनाने शहराबाहेर चालत आले. त्यांना तथागतांनी मनाई करूनही ते ऐकत नव्हते व मागे-मागे चालतच राहिले. लिच्छवींचा स्नेह,प्रेम व आदर बघून लिच्छवीजवळ* *आपली कोणतीतरी स्मृती राहावी म्हणून त्यांनी त्यांच्या जवळील भिक्षापात्र (चारिकापात्र)  लिच्छवींना दानस्वरुप दिला. ही घटना लिच्छवींनी शीलालेखावर लिहून ठेवली आहे .*

*४🔹. वैशालीचे अंतिम दर्शन*

*भगवान बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते. तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर अंबलठ्ठिकेला जाण्यासाठी निघाले. नालंदा पाटलिग्राम, कोटीग्राम, नादीका, आणि शेवटी वैशालीला गेले. प्रत्येक ठिकाणी तथागत थांबले आणि उपदेश दिला. तथागत वैशालीला पोहोचल्यानंतर  म्हणाले!!! ही माझी वैशाली नगरीची अंतिम भेट असणार आहे. ही वार्ता संपूर्ण वैशालीत वाऱ्यासारखी पसरली, वैशालीतील सर्व लोक दुःखी, खिन्न, व्यथित झालीत. भोजन  केल्यानंतर तथागतांनी आनंदासह कुसुमावती नदीच्या घाटावरील उंच ठिकाणी चढून संपूर्ण वैशालीचे दर्शन घेतले. वैशालीचे दर्शन घेऊन कायमचे सोडून जाण्यास निघाले. वैशालीला सोडताना  वारंवार मागे वळून.वळून  बघत होते. एवढे प्रेम तथागतांचे  वैशालीवर होते.*

*५🔹.आनंद श्रमनाचे परीनिब्बाण*

*तथागतांप्रमाणे स्थविर आनंदाला सुद्धा आपले परिनिर्वाण समीप आल्याचे आधीच समजले. त्यांना  सुद्धा वाटले की आपले परिनिर्वाण वैशालीलाच व्हावे. आनंद सुद्धा राजगृह सोडून वैशालीला जाण्यास निघाले. वैशालीला स्थविर आनंद येत असल्याची वार्ता कळताच, लिच्छवी स्वागतास तयार होते. परंतु स्थविर आनंदास वाटले की वैशालीस गेलो तर राजा अजातशत्रू यास वाईट वाटेल  आणि माघारी गेलो तर लिच्छवी नाराज होणार म्हणून यावर उपाय म्हणून पाच नदीचा संगम असणाऱ्या नदीच्या मध्यभागी गेले आणि त्या नदीच्या मध्यभागी जाऊन परिनिर्वाण प्राप्त केले. परिनिर्वाण समयी त्याचे वयोमान १२० वर्षे होते.  मगध नरेश अजातशत्रू व वैशालीचे लिच्छवी या दोघांनी स्थविर आनंदाचा अंत्यविधी गंडकी नदी किनारी पार पाडला. आनंदाच्या  अस्थी अवशेषाचे  समान दोन भाग करण्यात आले. एक भाग मगधाकडे तर दुसरा भाग वैशाली राज्यांनी घेतला. दोन्ही राजांनी अस्थी अवशेष आपल्या राज्यात नेऊन त्यावर स्तूप उभारले. लिच्छवींनी उभारलेला स्तूप वैशालीला आजही पाहायला मिळतो. सम्राट अशोकांनी पुढे त्याचे पक्क्या विटांचा वापर करुन या अर्धांग अवशेष स्तुपाचे पुनरुज्जीवन केले. अशोक स्तंभाच्या बाजूला आजही आहे.या स्तूपाच्या उत्खननात अस्थि रक्षेबरोबर पुढील वस्तू आढळून आल्या.एक  कवडी,काचेचे अमुल्यमणी,सोन्याच्या पुतळ्या,ताब्यांची आहत मुद्रा, रत्नजडीत विटा,किरीटयुक्त वानराची मृणमय मूर्ती  या बाबी विशेष उल्लेखनीय आहेत.* 

☸️ *माघ पौर्णिमेच्या  आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!!!!*✍️✍️✍️✍️✍️                                                           

 🪷 *शुभेच्छूकः- सुमंगल तथा रविंद्र अहिरे जिल्हा सरचिटणिस भारतीय बौद्ध  महासभा समता सैनिक दल.जळगाव  जिल्हा  पूर्व  विभाग*

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...