27 July 2024

भटक्याचे भारूड


 राज्यपालांचे नामनियुक्त सभासद म्हणून लक्ष्मण माने १९९० ते १९९६ या काळात महाराष्ट्र विधान परिषदेत कार्यरत होते. त्यावेळी निमित्तानिमित्ताने त्यांनी अनेक भाषणे केली, प्रश्न विचारले, प्रस्ताव मांडले. त्यातील निवडक साहित्य या पुस्तकात संग्रहित केले आहे. एक संवेदनाशील लेखक आणि तळमळीचा व तडफेचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी केलेल्या या मतप्रदर्शनाला आगळे मोल आहे. त्यांचा मुख्य रोख भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, त्यांना राखीव जागा व सवलती हा आहे आणि त्याचमुळे राज्यशासनातील वर्णव्यवस्था व नोकरशाहीची अनास्था यामुळे ते सतत क्षुब्ध आहेत. त्यांचा हा क्षोभ स्वाभाविकच तेजस्वी भाषेतून व्यक्त होतो

॥ ग्रंथाली ॥ * ॥

No comments:

Post a Comment

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...