07 December 2021

इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
  'अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!

  आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.
पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

06 December 2021

अन्न

 

शरद ऋतूतील एक उज्ज्वल दिवस, मुंग्यांचे एक कुटुंब उबदार सूर्यप्रकाशात कामात व्यस्त होते. उन्हाळ्यात त्यांनी साठवून ठेवलेले धान्य ते कोरडे करत असताना एक उपाशी टोळ आले.

 हात मध्ये  सारंगी घेऊन टोळ आला , टोळ नम्रपणे खाण्यासाठी काहीतरी खाऊ  मागू लागला. त्याचे बोलणे ऐकताच 

" मुंग्या ओरडल्या, “तुम्ही हिवाळ्यासाठी अन्न साठवले नाही का ?  उन्हाळ्यात तू झोपला  होतस कि काय  ?”

टोळ म्हणाला ." हिवाळ्यापूर्वी अन्न साठवण्यासाठी माझ्याकडे वेळ नव्हता,"  "मी संगीत करण्यात खूप व्यस्त होतो की उन्हाळा उडून गेला."

मुंग्या फक्त खांदे सरकवत म्हणाल्या, “संगीत बनवत आहात ना ? खूप छान, आता नाच !” मग मुंग्यांनी टोळाकडे पाठ फिरवली आणि कामावर गेल्या ...

https://cdn.shopify.com/s/files/1/0292/2958/0367/products/images_26_4db4d0c3-43f3-44cd-8fa8-5965c6b720cb_442x694.jpg?v=1605990391


05 December 2021

गुलाब

 एके काळी,  वाळवंटात, एक गुलाबाचे झाड होते त्याला खूप  सुंदर गुलाबाची लागलेली असत व ती  दिसला  खूप  सुंदर होती त्या झाडाला आणि त्याच्या फुलांना त्यांच्या सुंदर त्यात  खूप अभिमान वाटत होता.

 त्या झाडाची  एकच तक्रार होती  त्याच्या समोरच एक कुरुप निवडुंगाचे झाड वाढत होते.  गुलाबाचे झाड रोज  निवडुंगाचा अपमान करायचे  आणि त्याच्या दिसण्यावरून त्याची थट्टा करायचा, तर निवडुंग शांत बसून असल्याचं तो गुलाबाच्या झाडाला प्रतिउत्तर देत नसे . आजूबाजूच्या इतर सर्व वनस्पतींनी गुलाबाला समजवण्याचा प्रयत्न केला . परंतु ते झाड व त्याची फुले  स्वत: च्या दिसण्याने खूप गर्विष्ठ  झाली होती .

एक  काय झाले  वाळवंटात कडक  उन्हाळा पडला , वाळवंट कोरडे झाले आणि झाडांना पाणी उरले नाही. गुलाब पटकन कोमेजायला लागला. तिच्या सुंदर पाकळ्या सुकल्या, त्यांचा हिरवा रंग निस्तेज झाला 

त्यावेळी त्याची नजर निवडुंगाकडे गेले निवडुंगाकडे पाहत असताना गुलाबाच्या लक्षात आले  एक चिमणी पाणी पिण्यासाठी आपली चोच निवडुंगाच्या पानात  बुडवताना दिसली. 

शरमेने चूर झालेल्या    गुलाबाने निवडुंगाला  विचारले की तिला थोडे पाणी मिळेल का ? दयाळू निवडुंगाने  सहज सहमती दर्शवली आणि कठीण उन्हाळ्यात त्यांना मित्र म्हणून मदत केली.


इगो इज द् एनिमी

इगो इज द् एनिमी
अहंम् अर्थात इगो!

इगो लेव्हल सोडून मोठा होतो तेंव्हा अशा माणसाला दुसऱ्या शत्रुची गरज पडत नाही.स्वतःचा "इगो" च त्याच्या प्रगतीला खीळ घालतो.
थोडा विचार केला तर आपल्या लक्ष्यात येईल नात्यांमधील दुरावा, मैत्रीत निर्माण होणारी तेढ,नोकरी व्यवसायात थांबलेली प्रगती, वैर आणि शत्रुत्व याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे इगो कारणीभूत असतो.
रावणाची शक्ती ,भक्ती,बुध्दी प्रचंड असूनही त्याचा लय झाला तो केवळ त्याच्या इगो मुळे!
द्रौपदी मुळे कर्ण आणि दुर्योधनाचा इगो दुखावला गेला होता...पुढे महाभारत घडले.

पण या इगो ला जर आपण सुपर इगो बनवले तर? मग त्यातून जे तयार होते ,ते अतिशय भव्य असते.ते कसे या पुस्तकातून समजते.काय आहे हे पुस्तक?
    ऑबस्ट्रकल इज द् वे', ह्या पुस्तकात रायन हॉलिडे जीवन प्रवासातील बाह्य अडथळ्यांचा, तर आपल्या नव्या कोऱ्या पुस्तकात म्हणजेच, 'इगो इज द् एनिमी' मध्ये रायन आंतरिक अडथळ्यांचा वेध घेत, आपल्या तळहातावर व्यावहारिक आणि प्रेरणादायक तत्वज्ञान ठेवतो. या ग्रंथाच्या निमित्ताने इतिहासाच्या उदरात, शतकानुशतके मागे जाऊन नानाविध शक्तिशाली संकल्पनांचा अभ्यासपूर्ण शोध रायन यांनी घेतला आहे. तो वाचण्यासारखा आहे.
      अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे प्रतिपादन रायन यांनी आपल्या 'इगो इज द् एनिमी' या नव्या पुस्तकात केले आहे. रायन म्हणतो: 'तुम्हा-आम्हा सर्वांच्या कारकीर्दीच्या प्रारंभी, कौशल्ये शिकताना वा विकसित करताना, आपल्याला आपला अहंकारच प्रतिबंधित करीत असतो. जेव्हा आपण यशाची चव घेतो, तेव्हा अहंकार आपल्या स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करायला लागतो. अहंकार आपल्याला इतरांपासून सहजपणे दूर करीत एकटे पाडतो. यातून आपण अधःपतीत होऊ लागतो. एकूणच, अहंकार विनाशकारी असल्याचे रायन आपल्या निदर्शनास आणून देतो. म्हणूनच 'मी'पणाला अहंकाराला आपण वेळीच ओळखायला हवे! तसे झाले तरच, आपण आपले कार्य पूर्ण क्षमतेने करू शकू!
      आपल्या इच्छा-आकांक्षांच्या मागे धावताना वर्तमानाचे भान आपण सोडता कामा नये! मुख्य म्हणजे, आपण नम्र राहिले पाहिजे. मोठे यशवैभव प्राप्त झाल्यानंतरदेखील आपले पाय जमिनीवर घट्ट रोवलेले हवेत! यशापेक्षा अपयशातून आपल्याला खूप काही शिकता येते. त्यासाठी आपण लवचिक आणि ग्रहणशील राहिले पाहिजे. अहंकाराला हद्दपार करीत, नम्रता आणि आत्मविश्वास या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील, तर तुम्ही वास्तवाचा सहजपणे सन्मान करू शकाल! हा रायन हॉलिडेचा सांगावा आहे.

पुस्तक:इगो इज द् एनिमी'
लेखक:रायन हॉलिडे
मराठी अनुवाद: डॉ कमलेश सोमण आणि जीवन आनंदगावकर
प्रकाशन: गोयल प्रकाशन
पृष्ठ:२७२
मूल्य:२५०/ टपाल:३०/ एकूण:२८०/
खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर
 9421605019

02 December 2021

मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर

 कोना कोणाला शाळेत हि कविता शिकवत असताना झालेल्या गमती आटवतात 


मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन मोकाट मोकाट, त्याले ठायी ठायी वाटा । जशा वार्‍यानं चालल्या, पानावर्हल्यारे लाटा ।।
मन लहरी लहरी, त्याले हाती धरे कोन? । उंडारलं उंडारलं जसं वारा वाहादन ।।
मन जह्यरी जह्यरी, याचं न्यारं रे तंतर आरे । इचू साप बरा, त्याले उतारे मंतर ।।
मन पाखरू पाखरू, त्याची काय सांगू मात?। आता व्हतं भुईवर, गेलं गेलं आभायात ।।
मन चप्पय चप्पय, त्याले नही जरा धीर । तठे व्हयीसनी ईज, आलं आलं धर्तीवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना । मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥

कवयित्री – बहिणाबाई चौधरी




मेरा बाबा देशचालता ....

 मेरा बाबा देशचालता ....

                           मेरा बाबा देशचालता ....

 आज सकाळी पावणे नऊच्या दरम्यान माझ्या ऑफिस च्या ग्रुप वरती एक रतन टाटांनी शेअर केलेल्या व्हिडिओ आला व्हिडिओ पाहिला आणि क्षणभर स्तब्ध झालो आणि कोर्ट सिनेमाची आठवण झाली.

 आठवणींचे झरे वाहू लागले आणि काही वर्ष पूर्वीचा एक क्षण आठवला माझा सिनेमा  पाहणे एक छंदच आहे आणि कोणासोबत बघायचा  हा एक महत्वाचा भाग हे माझं वैयक्तिक  मत आहे. मी सिनेमा माझ्या दोन मित्रांसोबत पहातो गणेश शेटे आणि श्रीकांत चावडीमनी  नेहमी आम्ही सिनेमे एकत्रच  पाहतो पण कुण्या एकट्याने पाहिलेला सिनेमा जर आवडला तर परत सर्वांनी एकत्र मिळून  पहाणे हा नियम ठरलेलाhttps://youtu.be/pcNHMopzZas

  काही वर्षां पूर्वी कोर्ट हा सिनेमा पाहून झाल्यानंतर आम्ही तिघांनी एकत्र फारशी काही चर्चा केली नाही. 

चर्चा केली नाही म्हणजे फक्त आम्ही एकामेकांकडे पाहत होतो कदाचित याच्या विषयी काय बोलावं ते सुचत नव्हतं किंबहुना याविषयी खूप काहीतरी बोलले गेले पाहिजे असं वाटत असलं तरी आम्ही एकमेकांना फक्त पाहतच राहिलो होतो विषय तसा गंभीर होता . खरं बघायला गेलं तर त्या सिनेमाने डोळ्यासमोर समाजा मधला एक दुर्लक्षिलेला असा वर्ग आणला होता की जो समाजासाठी एका युद्धाचे काम करीत आला आहे  आणि करतो आहे.

 ह्या विषयावर आमच्या मध्ये झालेंनी सर्व चर्चा मी सांगत नाही  पण आमच्या चर्चा मध्ये बरेच मोठे नेते, समाजसुधारक येऊन गेले त्यामध्ये प्रामुख्याने विनोबा भावे यांनी तुरुंगात असताना त्यांनी घेतलेली सफाई  कामाची घेतलेली भूमिका आणि तिचे महत्व
                                  लक्षत आले.
त्यानंतर बराच वेळ मी माझ्या कितीतरी मित्रांशी , सहकार्‍यांशी चर्चा केली की तुम्ही कोर्ट  हा सिनेमा पाहिला आहे का तर बऱ्याच जणांच्या बोलण्यात आले की नाही आणि त्यातील बऱ्याच जणांना अजून माहीत नाही की कोर्ट  सिनेमाने कोणाचा होता त्याचा विषय काय होता.

तर मित्रानो  रतन टाटा यांनी शेयर केलेले हो विडिओ  पाहिल्यानंतर कोर्ट सिनेमा नक्की पहा….

        कोर्ट हा २०१४ चा भारतीय बहुभाषिक कायदेशीर नाटक चित्रपट आहे, जो चैतन्य ताम्हाणे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. हा चित्रपट नारायण कांबळे ( विरा साथिदार ) या वृद्ध विरोधक गायकाच्या मुंबई सत्र न्यायालयात खटल्याद्वारे भारतीय कायदेशीर व्यवस्थेचे परीक्षण करतो, ज्यावर त्याच्या एका लोकगीताद्वारे गटार सफाई कर्मचाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

चित्रपटाचे संगीत संभाजी भगत यांनी दिले होते तर मृणाल देसाई आणि रिखव देसाई यांनी अनुक्रमे छायालेखक आणि संपादक म्हणून काम केले होते. वास्तविक कोर्टरूम आणि चित्रपटांमध्ये त्यांचे चित्रण कसे केले जाते यातील फरक पाहण्यासाठी ताम्हाणे उत्सुक होते. चित्रपटात मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषा बोलल्या जातात. बहुतेक संवाद मराठीत आहेत कारण ते महाराष्ट्रात सेट आहे. कायदे इंग्रजीत वाचले जातात. बचाव पक्षाचे वकील हे गुजराती असून ते गुजराती भाषा बोलतात.

२०१४  मध्ये ७१  व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोर्टचा प्रीमियर झाला, जिथे त्याने होरायझन्स श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि ताम्हाणेसाठी लुइगी डी लॉरेंटिस पुरस्कार जिंकला. या चित्रपटाने अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये १८ इतर पुरस्कार जिंकले. २०१४ च्या मुंबई चित्रपट महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात त्याचा प्रीमियर भारतात झाला आणि १७ एप्रिल २०१५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यावर, चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि ६२ व्या राष्ट्रीय चित्रपटात सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकला. पुरस्कार.

 

ययाती

 ययाती

महाराष्ट्र साहित्यात सर्वोत्कृष्ट १० किंवा ५ कादंबऱ्यांची नावे घेतली तर त्यात ययातीचे नाव अग्रक्रमाने येईल. तशी ही कादंबरी आहेच.              

कादंबरी    मेहता  पब्लिशिंग हाऊस यांनी प्रकाशित केली आहे आणि मुखपृष्ठ देखील त्यांच्या तर्फेच रेखाटण्यात आले आहे. मुखपृष्ठ पांढऱ्या आश्वाच्या चित्राने रंगवले आहे. पुस्तक वाचून झालं की मग तुम्हाला त्यामागचा अर्थ कळेल की आश्वाचं चित्र का आहे ते ?

ययाति ही खांडेकरांची सर्वोत्कृष्ट रचना. वाचून झालं की हे उमगेलच. कथा महाभारतकालीन आहे. ययाति या राजाच्या आयुष्याची कहाणी. पण फक्त ययातिच नाही तर कच , देवयानी, शर्मिष्ठा या पात्रांचीही ही गोष्ट आहे. कथा ही पौराणिक असून कथेचा जो गाभा पुराणात आहे तोच इथेही आहे पण खांडेकरांनी काही धागेदोरे स्वतंत्र रीतीने यात गुंफले आहे. फार ताकदीने लेखन केलंय त्यांनी. यातल्या मुख्य चार पात्रांना एकमेकांविषयी प्रेम वाटते पण ते पुढे असफल , क्षणिक आणि अपुरे राहते.

कामवासना हा या कादंबरीचा गाभा ! मनुष्य शरीरसुखामागे / क्षणिक सुखामागे धावतो , त्याला आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान देतो आणि विनाशाकडे जात अनेकवेळा उपभोग घेऊनही अतृप्तच राहतो. हा या कादंबरीचा थोडक्यात सार . कथा जशी जशी पुढे जाते तसे तसे नवनवीन पात्र येत जातात. मुख्य चार पात्रे यात आहेत. जी शेवटपर्यंत राहतात.

यातला कच हा आधुनिक काळातल्या आदर्श पुरुषाचा नेतृत्वकर्ता. महाभारतातला खरा कच वेगळाच आणि या कादंबरीतला खांडेकरांचा कच वेगळा. फारच उत्कृष्टपणे त्यांनी तो रेखाटलाय . तो ध्येयवादी आहे. आसपास तो वासना बळावू देत नाही. तो संयमी आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर तो निरपेक्ष प्रेम करतो , त्याचे देवयानी वरचे प्रेम जरी असफल झाले असले तरी तो थांबला नाही तो निर्मळ सरितेसारखा अविरत वाहतच राहिला. एकेकाळची आपली प्रेयसी आता संसारी स्त्री बनली आहे हे ध्यानात धरून ज्याप्रकारे तो देवयानी सोबत संवाद साधतो ते वर्णन तर उत्कृष्टच आहे.

देवयानी या पात्राचे तिच्या आयुष्यात ध्येय काहीच नव्हते. लाडात वाढलेली पोर ती. हे किती प्रातिनिधिक आहे बघा ! आजच्या काळातही परिस्थिती एकदम अभिन्न. श्रीमंत घरात वाढलेली बहुतांश मुले ध्येयहिनच असतात. बऱ्याचदा आंतरिक विचार त्यांच्या ठायी नसतो. इथेही तसच होतं. कुठलाही योग्य निर्णय न घेता , पुरेसा विचार न करता फक्त शर्मिष्ठेचा बदला घेण्यासाठी - तिला आपली दासी बनवण्यासाठी देवयानीने यायातिशी लग्न केलं. त्यानंतर ती ययातिला ना प्रेम देऊ शकली ना शारीरिक - मानसिक सुख ! उलट आई झाल्यावर देखील तिच्यातली अवखळ , हट्टी आणि अविचारी लहान पोर दिसून येते.

आणि कदाचित याच कारणामुळे ययाति शर्मिष्ठेवर प्रेम करू लागला. एका आदर्श पत्नीने जे पतीला द्यायचे असते ते सर्व शर्मिष्ठेने ययातिला दिले. श्रीमंत वडिलांची मुलगी असूनही स्वतःच्या एका चुकीमुळे ती आयुष्यभर दासी बनून राहते. सर्व समस्यांना तोंड देते. सुख - विलासाचा त्याग करते , हे धाडसच !

कादंबरीत भावनात्मकतेचा मजबूत स्पर्श आहे. खांडेकरांची भाषा , त्यांची कल्पनाशक्ती आणि अधून मधून येणारी जीवन आणि वासना यांच्यावर भाष्य करणारी मजबूत वाक्ये.. खूप भावतात. कादंबरीची मांडणी खरंच खूप सुरेख आहे.

कादंबरी वाचताना अनेकदा व्यक्ती भावनातीत होऊन जातो. मीही झालो होतो. अनेक प्रसंग तर असे आहेत जे वाचल्यावर एखादा मर्मभेदी बाण काळजातून चर्र भेदून जावा असा धक्का लागून डोळ्यातून अश्रू येतात. कथेतल्या अलका आणि माधवी यांच्या प्रसंगात हे होतं !

वाचताना आपण प्रत्येक पात्राशी समरस होऊन जातो त्यामुळे एक एक प्रसंग जसा येतो तसं आपल्या अंतर्मनात राग , द्वेष , मत्सर , अश्रू , दया , कणव , करुणा , आसुया या भावना युद्ध करतात. हरवून जायला होतं. खांडेकर जीवनाचं अंगभूत दर्शन घडवतात.कादंबरीतलं प्रत्येक पात्र आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतं.

काही कादंबऱ्या मादक असतात. त्या भुरळ पडतात , ययाति - मृत्युंजय या कादंबऱ्या त्याच पट्टीतल्या.

ययाती समजून घ्यावी लागते !

सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही कादंबरी प्रातिनिधिक आहे. ती प्रातिनिधिक आहे आजच्या काळाशी - आजच्या समाजाशी. यातली सर्व प्रमुख पात्रे आजच्या पिढीतल्या मनुष्याचे प्रतिनिधी आहेत.

     ही कथा तर वाचाच पण पुस्तकात कदाचित मुद्दाम दिलेली पार्श्वभूमी वाचाच वाचा. कादंबरी कशी जन्माला आली फक्त हेच नाही तर आजचा समाज , यातले व्यक्ती , भरकटलेली मानसिकता , पिसाळलेली कामवासना या सर्वांवर खांडेकरांनी अगदी आग ओकल्याप्रमाणे परखड भाष्य केलंय. चुकीच्या मार्गाने चालत असलेल्या समाजाबाबत त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर कामवासना ही एका विशिष्ट मर्यादेत असायला हवी असेही ते म्हणतात. जर तुम्ही ही पार्श्वभूमी वाचली नाही तर पुस्तक अर्धवट वाचल्यासारखं होईल.

कादंबरी वाचल्यावर तुम्हाला अनेक गोष्टी कळतील , समजतील , नव्याने उमगतील. खऱ्या अर्थाने वाचकांना मोठं करणारी कादंबरी !

 

विशाखा

म ध्यंतरी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितेवरून समाज माध्यमांवर मोठा वादंग सुरू होता. त्यात एक बाब ठळकपणे अधोरेखित झाली, ती म्हणजे आजच्या तरुण पिढ...